निळ्या आभाळवाटांनी पंख पसरुन एकेकटयाने किंवा थव्यांनी उडणारे पक्षी पाहताना मुलांच्या मनात येते, ’आपणही असे पंख पसरुन वार्यावर स्वार व्हावे.’
मायभूमी या विषयांवरील कविता मुलांमध्ये निष्ठेचे स्फुलिंग चेतवतात आणि राष्ट्राविषयी आपल्या जबाबदारीची जाणीव करुन देतात.
महापुरुषांची चरित्रे स्फूर्तिदायक असतात. त्यांच्या उदात्त जीवनमूल्यांचे त्या चरित्रांतून आकलन होते. त्या विभूतींवरील कविता वाचून मनाला उभारी मिळत..