HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
रे अजात अज्ञात सखे जन या वेळीं माझ्या रे रमणा
गोंधळाचें घर


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



31GOOG
गोंधळाचें घर

त्या दारावरुनी कोण निघे ?

वाराही चोरापरी रिघे. ध्रु०

निद्रारस संध्या न शिंपडे,

चंद्र शांतिचा सडा न तिकडे

करुनी निसटे चोरसा गडे,

नभ उघडुनि डोळे कधिं न बघे. १

सुवास-सुरिं गे फुलें न गाती,

परस्परीं नच कधिं कुजबुजती,

सुखदुःखाच्या गोष्टि न करिती,

यम घुमटीं काळी घोंगडि घे. २

तिथे न मानव, भुतेंच जमती,

न कळे खिदळति किंवा झुंजति,

नाण्याच्या नादावर नाचति,

गे विचित्र चाळे ते अवघे ! ३

आपण फिरकूं तिथे न सुंदरि,

बसोनि राहूं गे घरचे घरिं,

घरींच घुमवूं गोड बांसरी,

कधिं नांवही न त्या घरचें घे. ४

Translation - भाषांतर

N/A
31GOOG

कवी - भा. रा. तांबे

जाति - नववधू

राग - बागेश्री

इंदूर, ता. २४ नोव्हेंबर १९२०



Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-13T09:09:12.2273328Z

Comments | अभिप्राय