HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
जन पळभर म्हणतिल हाय हाय मरणांत खरोखर जग जगतें
निरोप घेतांना


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



12GOOG
निरोप घेतांना

जगाच्या बागेंत

फुललें मी फुल,

लागली चाहूल

प्रेमी लोकां. १

जन जिव्हाळ्याचे

भोवती मिळाले;

मज सांभाळिलें

नानापरी. २

अगे मायभूमी,

किती लाडके मी !

अंकीं घेशी प्रेमीं

मज दीना. ३

अहा रे वरुणा,

वर्षोनी करुणा,

पाजिलें जीवना

दिसंदीस ४

जगाच्या लोचना,

न्हाणोनी किरणीं

इंद्रचापवर्णी

शृंगारीले. ५

अगा वायुराया,

कोवळ्या अंगुली

लावोनिया गालीं

हासव्लें. ६

जातें ! मज आतां

मंगलाचें धाम

मूर्त जगत्प्रेम

बोलावीतें. ७

घराशीही जातां

हुरहूर वाटे,

अश्रूपूर दाटे

लोचनांत. ८

असें हीन दीन

सार्‍यांचें मी ऋणी,

उपेक्षिलें कुणीं

नाहीं दीना. ९

नानापरी झाले

अपराध कोटी,

घालोनिया पोटीं

क्षमा कीजे. १०

आतां शेवटील

परिसा विनंती

पायीं डोई अंतीं

ठेवीतसें ११

लोभ असों द्यावा

आतां पूर्वींपरी,

जरी जातें दुरी

काळाआड. १२

सारे प्रेमीजन

करा बोळवण,

पुढे आठवण

राहूं द्यावी. १३

Translation - भाषांतर

N/A
12GOOG

कवी - भा. रा. तांबे

अभंग - छंद देवद्वार

ठिकाण - अजमेर

दिनांक - १८ ऑगस्ट १९२१



Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-13T09:55:52.7342640Z

Comments | अभिप्राय