HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
स्वारी कशी येईल निजल्या तान्ह्यावरी
वैरिण झाली नदी !


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



31GOOG
वैरिण झाली नदी !

कशि काळनागिणी वैरिण झाली नदी ! ध्रु०

प्राणविसावा पैलतिरावरि, अफाट वाहे मधीं. १

सुखी मीन हे तरति न गणुनी लाटा कोट्यावधी. २

सुखी पांखरें गात चाललीं पार वादळीं सुधी. ३

पापिण खिळलें तिरा, विरह हा शस्त्राविणें वधी. ४

पैलतटिं न कां तृण मी झालें ? तुडविता तरी पदीं ! ५

पैलतटिं न कां कदंब फुललें ? करिता माळा कधीं. ६

प्राणाचें घे मोल नाविका, लावि पार, ने अधीं ! ७

Translation - भाषांतर

N/A
31GOOG

कवी - भा. रा. तांबे

जाति - समुदितमदन

राग - पिलू

ठिकाण - अजमेर

दिनांक - डिसेंबर १९२१



Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-13T10:07:20.4231120Z

Comments | अभिप्राय