HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
निजल्या तान्ह्यावरी जन म्हणती सांवळी
कळा ज्या लागल्या जीवा


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



17GOOG
कळा ज्या लागल्या जीवा

कळा ज्या लागल्या जीवा मला कीं ईश्वरा ठाव्या !

कुणाला काय हो त्यांचें ? कुणाला काय सांगाव्या ?

उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई ?

समुद्रीं चौकडे पाणी, पिण्याला थेंबही नाहीं.

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !

हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू.

नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा,

भुतांची झुंज ही मागें, धडाडे चौंकडे दावा.

नदी लंघोनि जे गेले तयांची हांक ये कानीं,

इथे हे ओढिती मागें मला बांधोनी पाशांनीं.

कशी साहूं पुढे मागें जिवाला ओढ जी लागे ?

तटातट्‌ काळिजाचे हे तुटाया लागती धागे.

पुढे जाऊं ? वळूं मागें ? करूं मी काय रे देवा ?

खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा !

Translation - भाषांतर

N/A
17GOOG

कवी - भा. रा. तांबे

वृत्त - वियद्‍गंगा

ठिकाण - अजमेर

दिनांक - ३० जानेवारी १९२२



Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-13T10:10:09.8567456Z

Comments | अभिप्राय