HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
कोण रोधील वसंत फेरीवाला
प्रतिज्ञा


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



3GOOG
प्रतिज्ञा

धळीलाहि जाऊं मिळोनी सुखें,

घरालाहि होऊं सुखें पारखे,

उपाशी मरूं दूर देशांतरीं.

वनीं रानिं हिंडूं पिशाचापरी,

सुळाच्या अती तीव्र धारेवरी

हसोनी सजूं रक्तपुष्पापरी,

असत्या तुझ्या हा न माथा झुके,

जरी कापशी, काप येईं सुखें !

जुलूमा न दे अंगुली हात हा,

कलम् कर सुखें, आण चाकू पहा ! १०

असे दोगला, दो पित्यांचा तरी

फसे ऐंद्रजालीं तुझ्या यावरी !

फिरूं नागवे होउनी वानरें,

विषारी तुझे ते दुशाले पुरे !

तुझ्या त्या महालां विलासां भुले

महारौरवीं घोर नर्कीं गळे !

नको स्पर्श हा दुष्ट माये अगे !

भुतासारिखा मोह आतां निघे ! १८

Translation - भाषांतर

N/A
3GOOG

कवी - भा. रा. तांबे

वृत्त - सौदामिनी

राग - मालकंस

ठिकाण - अजमेर

दिनांक - २६ सप्टेंबर १९२२


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-14T06:14:56.0610720Z

Comments | अभिप्राय