HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
फसवणूक माळीण
अहो धन्वंतरी !


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



18GOOG
अहो धन्वंतरी !

"तुम्हीं न यावें हो धन्वंतरि, जरी तापलें ज्वरें;

नका शिवूं नाडीस, तुम्हांला काय दुसरीं घरें ?"

"तुम्हां पाहिजे शेज फुलांची"- "पुरे ज्ञान हो पुरे !

आग अधिक होइल अंगाची ! खरेंच औषध खरें !"

"मग वाळ्याची उटी कपाळीं लावूं शीतळ करें ?"

"शूल दुणावे, हात न लावा. भरे मला कांपरें !"

"तुमच्या अंगा हवें चांदणें, नेउं धरुनि का त्वरें?"

"नको नको हो ! पडेन, वादळिं कशी वेल सावरे ?"

"तुम्हांस शीतोलपादि चूर्णें वाटेलच हो बरें;

काय, घालुं मी मुखीं मधांतुनि ?" "कधीं सोंग हे सरें ?

तो शिवेल नाडिस करग्रहण ज्या हवें,

स्पर्शील अंग जो देइल जीवन नवें;

त्या निदान हो ज्या मनिंचें गुज जाणवे.

प्रणयपंडिता, तुम्हां आणखी काय सांगणें बरें ?"

रसिका, सांगा कसली मात्रा मिळतां रोग न उरे?

Translation - भाषांतर

N/A
18GOOG

कवी - भा. रा. तांबे

जाति - समुदितमदना

ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

दिनांक - २३ डिसेंबर १९३४


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-15T12:56:19.9854048Z

Comments | अभिप्राय