HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
माझ्या अंगणांत वाटेच्या वाटसरा
लाजूं नको ताई !


भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात



14
लाजूं नको ताई !

"माझ्या दारावरनं कोण गेलं झपाट्याचं ?"

"लाजूं नको ताई, तें ग वारं सोसाट्याचं" १

"माझ्या दारावरी घोड्याची वाजे टाप"

"लाजूं नको ताई, डफावरी वाजे थाप." २

"माझ्या दारावरी हळू बोले कुणी तरी"

"लाजूं नको ताई, कुणी वाजवी बासरी. ३

लाजूं नको ताई, ढुंकूं नको बारींतूनी,

खंत कोणाची ग? आलं कोणाचं ग कोणी? ४

पाहुणा आला दारीं कुणी तरी ग रात्रींचा,

पाहीं बहिणाताई, का ग तुझ्या ओळखीचा? ५

वेणीफणी करीं, घाईघाई घालीं साज;

कोणी कोणाचं ग सांजचं आलं आज ? ६

लाजूं नको ताई, पाय धुण्या आणीं पाणी;

चांदीचे प्याले आणीं चांदीची चहादाणी." ७

Translation - भाषांतर

N/A
14

कवी - भा. रा. तांबे

ओवी

ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

दिनांक - २५ फेब्रुवारी १९३५


Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-09-15T16:04:32.8637664Z

Comments | अभिप्राय

Please join {Khapre.org} Group on facebook and to write on to our wall, participate in group discussions..

Connect to us